बंद

महत्वाची ठिकाणे

अ.क्र. पर्यटन स्थळाचे नाव
1 संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
2 कन्हेरी गुंफा (लेणी)
3 आरे कॉलनी
4 छोटा कश्मिर
5 विहार आणि पवई तलाव
6 तुळशी तलाव
7 एस्सेल वर्ल्ड
8 वॉटर किंगडम
9 मार्वे बीच
10 गोराई बीच
11 आकसा बीच
12 महाकाली लेणी
13 जुहू चौपाटी
14 माउंटमेरी चर्च
15 चित्रनगरी
16 वांद्रे-वरळी सागरी महामार्ग
वांद्रे-वरळी सागरी महामार्ग

वांद्रे-वरळी सागरी महामार्ग :

वरळी सीलिंक अधिकृतपणे राजीव गांधी सी लिंक म्हणून ओळखले जाते, वांद्रे वरळी सागरी लिंक हा आठ-लेन केबल स्ट्रीट ब्रिज आहे जो वांद्रे आणि वरळीच्या भागांशी जोडतो. यात कॉन्ट्रक्ट-स्टील व्हियाडेट्सचे दोन्हीही बाजू आहेत, जे त्यास ताकद पुरवतात. मुख्य व्यवसाय केंद्र नरिमन पॉइंट यांच्यासह मुंबईच्या पश्चिम उपनगरे जोडण्यासाठी हा पूल उपयोगी आहे. हिंदुस्थान कंस्ट्रक्शन कंपनीने महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) आदेशानुसार हे भव्य पूल बांधला होता तो जून 2009 मध्ये सार्वजनिक उघडण्यात आला आणि तेव्हापासून वांद्रे आणि वरळी दरम्यानचा प्रवास वेळ प्रचंड कमी झाला आहे.

जुहू चौपाटी

जुहू चौपाटी :

जुहु कोळीवाडा ते मोरांगांव अशी ४.५ कि.मी लांबीची चौपाटी लाभली आहे. हे स्थळे अंधेरी स्टेशनपासुन अंदाजे ४.कि.मी. असुन त्या ठिकाणी जाण्यासाठी बस, रिक्षा, टॅक्सीची सोय आहे. चौपाटीवर शनिवार,रविवार व इतर सुटीच्या दिवशी मोठया प्रमाणवर पर्यटक येत असतात. गणपती विर्सजन, छटपुजा सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येवुन हे सण साजरे करतात. चौपाटीवरील साफसफाईचे काम बृहन्मुबई महानगर पालिका करते. समुद्रात येणाऱ्या भरती-ओहोटीचे फलक लावले आहे. समुद्रात दुर्घटना घडु नये म्हणुन लाईफ गार्डची सोय केली आहे. मुंबईतील सर्वात जुन्या ठिकाणांपैकी जुहू चौपाटी हे विले पारले येथे स्थित आहे.