बंद

संजय गांधी योजना

प्रस्तावना: 

महाराष्ट्र सरकार, निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुलांना, दिर्घ आजार, घटस्फोटीत स्त्रिया, सोडून दिलेल्या स्त्रिया, वेश्याव्यवसायातून मुक्त स्त्रिया इ. विविध योजनांद्वारे आर्थिक मदत पुरवते. या योजनांमध्ये काही योजना राज्य सरकार आणि काही केंद्र शासनाकडून कार्यान्वित केल्या आहेत आणि काही योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे एकत्रित अंमलात आणली आहेत.

संपर्क :-

कार्यालयाचे नाव कार्यालयाचा पत्ता
तहसीलदार संजय गांधी योजना, अंधेरी

अंधेरी तहसीलदार कार्यालय परिसर, दादाभाई नौरोजी रोड, अंधेरी (पश्चिम) मुंबई-400058

तहसीलदार संजय गांधी योजना, बोरिवली

एक्सर रोड, सी.के.पी. कॉलनी, गणेशमंदिर समोर, बोरिवली (पश्चिम) मुंबई-400092

तहसीलदार संजय गांधी योजना, कुर्ला सरोजिनी नायडू रोड, कुर्ला तहसीलदार कार्यालय जवळ, मुलुंड (पश्चिम) मुंबई-400080

संजय गांधी निराधार अनुदान योजना:

उद्देश :निराधार व्यक्ती, अंध, विकलांग, अनाथ मुलांना, दिर्घ आजारी व्यक्ती, घटस्फोटीत स्त्रिया, सोडलेली महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त स्त्रिया, अत्याचारी महिला, ट्रान्झेंडर इत्यादींना आर्थिक मदत करणे.

पात्रता निकष :-

  • वय 65 वर्षांपेक्षा कमी
  • वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. 21,000 / – पर्यंत

आर्थिक मदत :-

प्रत्येक लाभार्थीस दरमहा प्रत्येकी 600 / – आणि एकापेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या कुटुंबास दरमहा 900 रुपये मिळतील. लाभार्थींना त्याच्या / तिच्या अपत्याचे वय 25 वर्ष होईपर्यंत, किंवा तो / ती नोकरी करे पर्यंत , जे आधी होईल लाभ दिला जाईल. जर लाभार्थीला फक्त मुलीच असतील, तर जरी त्या 25 वर्षांच्या झाल्या किंवा विवाहित असल्य तरीही लाभ कायम राहील.

आवश्यक कागदपत्रे :-

  • अर्ज
  • रहिवासी दाखला
  • वयाचा दाखला
  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या उत्पन्नाचा दाखला / पुरावा
  • सिव्हिल सर्जन आणि शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांनी वितरीत केलेले आजाराचे प्रमाणपत्र.

संपर्क :-

तहसिलदार, संजय गांधी योजना संबंधित तालुका

श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना :

उद्देश: :-निराधार वृद्धांना मासिक पेन्शन प्रदान करण्यासाठी.

पात्रता निकष :-

  • 65 वर्ष आणि 65 वर्षांवरील निराधार व्यक्ती
  • वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. 21,000 / – पर्यंत किंवा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील सदस्य.
  • व्यक्ती राज्यात 15 वर्षां पासून रहिवासी असावी.

आर्थिक मदत :-वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. 21,000 / – पर्यंत असलेल्या लाभार्थींसाठी दरमहा रु .600 / – पेंशन. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील लाभार्थीसाठी रु. 400 / – प्रत्येक महिन्याला पेंशन रक्कम + रु. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध पेन्शन योजनेतून दरमहा 200 रुपये.

आवश्यक कागदपत्रे :-

  • अर्ज
  • रहिवासी दाखला
  • वयाचा दाखला
  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या उत्पन्नाचा दाखला / पुरावा.

संपर्क :-तहसिलदार, संजय गांधी योजना संबंधित तालुका.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेंशन योजना : 

उद्दिष्ट: :-निराधार वृद्धांना मासिक पेन्शन प्रदान करणे.

पात्रता निकष :-

  • 65 वर्ष आणि 65 वर्षांवरील निराधार व्यक्ती
  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांतील व्यक्ती
  • व्यक्ती राज्यात 15 वर्षां पासून रहिवासी असावी.

आर्थिक मदत :-प्रत्येक महिन्याला पेंशन रक्कम रू. 200/- + श्रावण बाळ राज्य सेवा निवृत्ती वेदान योजनेतून रु. 400 / – दरमहा

आवश्यक कागदपत्रे :-

  • अर्ज
  • रहिवासी दाखला
  • वयाचा दाखला
  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या उत्पन्नाचा दाखला / पुरावा.

संपर्क :-तहसिलदार, संजय गांधी योजना संबंधित तालुका.

इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व / दिव्यांग पेंशन योजना :-

उद्देश :- अपंग व्यक्तींना मासिक पेंशन प्रदान करण्यासाठी.

पात्रता निकष :-

  • 18 ते 65 वयोगटातील वयोगटातील दिव्यांग व्यक्ती.
  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांतील व्यक्ती
  • व्यक्ती राज्यात 15 वर्षां पासून रहिवासी असावी.

आर्थिक मदत :-प्रत्येक महिन्याला पेंशन रक्कम रू. 200 / – + संजय गांधी निराधार अनुदान योजना पासून दरमहा 400 रुपये.

आवश्यक कागदपत्रे :-

  • अर्ज
  • वयाचा दाखला
  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या उत्पन्नाचा पुरावा.
  • केंद्र सरकारच्या नियमानुसार अपंगत्वाचे प्रमाणपत्र.

    संपर्क :-तहसिलदार, संजय गांधी योजना संबंधित तालुका.

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा महिला पेंशन योजना :-

उद्देश :- विधवा महिलांना मासिक पेन्शन प्रदान करणे.

पात्रता निकष :-

  • 40 ते 65 वयोगटातील विधवा महिला.
  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांतील व्यक्ती
  • व्यक्ती राज्यात 15 वर्षां पासून रहिवासी असावी.

आर्थिक मदत :-प्रति महिना रू. 200 / – + संजय गांधी निराधार अनुदान योजना पासून 400 रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे :-

  • अर्ज
  • वयाचा दाखला
  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या उत्पन्नाचा पुरावा.
  • पतीच्या मृत्यूचा दाखला.

संपर्क :-तहसिलदार, संजय गांधी योजना संबंधित तालुका.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना :

उद्देश :-कमावती व्यक्तीच्या मृत्यूनंतर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना एकरकमी कुटुंब लाभ प्रदान करणे.

पात्रता निकष :-

  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 18 ते 64 वयोगटातील प्राथमिक कमावती व्य्क्तीचा मृत्यू झाल्यास.

आर्थिक मदत :- 10,000/ – रुपयांची एकरकमी रक्कम.

आवश्यक कागदपत्रे :-

  • अर्ज
  • वयाचा दाखला
  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या उत्पन्नाचा पुरावा.
  • मृत्यूचा दाखला.

संपर्क :-तहसिलदार, संजय गांधी योजना संबंधित तालुका.